Tuesday 14 November 2017

#कवितासंग्रह #मराठीकविता #चेतकबुक्स

‘कोंडमारा’ हा सौ. वंदना हुळबत्ते यांच्या एकूण संकलित केलेल्या कवितांचा पहिलावहिला संग्रह आहे. त्यामुळे यात पहिल्या लेखनाच्या खाणाखुणा जाणवणे हे तसे स्वाभाविक म्हटले पाहिजे. तशा त्या आपल्याला जाणवतीलच. पण त्याचबरोबर आणि त्याच वेळी आपणास त्यांच्या कवितेतील साधकबाधक गुणवत्तेची पण जाणीव होऊन आनंद वाटेल असे वाटते. साधकबाधक याकरिताच म्हणावेसे वाटते की, त्यांच्याठायी कवितेची, म्हणजेच कवितेच्या विषयाची आणि रचनेची अशी एक अंतर्गत जाण आहे हेही त्याचवेळी जाणवेल. त्यांची काव्यरचना त्या अर्थाने कोणत्याही रसिकाला आशादायक वाटावी अशीच आहे. भविष्यात त्यांची ही समज आणखीनच गती घेऊ शकेल असा विश्‍वास प्रकट करण्याइतपत ही समज आढळून येते. त्यांचा हा काव्यसंग्रह आपणास हेच सांगतो आहे. या संग्रहाला कोंडमारा हे शीर्षकच अत्यंत सार्थ आहे असे वाटते. हा कोंडमारा केवळ व्यक्तिगत पातळीवरील नसून त्याचवेळी तो सामाजिक स्तरावरीलपण आहे. हा एक प्रकारचा स्त्रीमनाचा, स्त्रीजाणिवांचा कोंडमारा आहे.
- वैजनाथ महाजन
चेतक बुक्स, पुणे 30.

#कवितासंग्रह  #मराठीकविता  #चेतकबुक्स

Saturday 4 November 2017

मराठी कविता संग्रह

मराठी कविता संग्रह

माणूस माणसापासून दूर गेला. पुन्हा तो व्यवहारी व स्वमग्न बनला. कधी कधी तो सैरभैर वाटतो. अस्वस्थ वाटतो.
कल्पनासृष्टी आणि वास्तव या दुविधांची सर्कस सुरू होते. कधी कधी ह्या खेळात व्यवहाराचा विजय होतो तर कल्पनासृष्टीचा पराभव. कधीकधी जीवघेण्या आघातानं मन व्याकुळ होतं. शेवटी अशा व्यवहारांपासून सुटका करून घ्यावी असं वाटतं.
अशा अस्वस्थ वर्तनांची विभ्रम, स्पंदने टिपली आहेत या कविता संग्रहात

कवी : प्रा. झुंजार माने
मूल्य 140


चेतक बुक्स्, पुणे 30


संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज हे जगप्रसिद्ध आहेत ते त्यांच्या ज्ञानेश्‍वरी या ग्रंथामुळे. खरे तर ज्ञानेश्‍वरी हे नाव संत ज्ञानेश्‍वरांनी दिलेले नाही. त्यांनी नाव दिले ते “भावार्थ दीपिका”. पण काळाच्या ओघात लोकांनी त्या ग्रंथाचे नाव ज्ञानेश्‍वरी ठेवले आणि तेच लोकप्रिय झाले. संत ज्ञानेश्‍वरांनी, भगवदगीतेवरील ग्रंथ ज्ञानेश्‍वरी व्यतिरिक्त अमृतानुभव, हरिपाठ, चांगदेव पासष्टी व अनेक अभंग लिहिले आहेत. संत ज्ञानदेव महाराजांचे अभंग अतिशय उच्च दर्जाचे, गूढ अर्थाचे व समजण्यास कठीण असे आहेत. त्यामुळे ते फारसे लोकप्रिय नाहीत. पण त्याचा अर्थ समजला तर ते हृदयात कायमचे कोरले जातील. भक्तीतील उच्च दर्जाची अवस्था प्राप्त झाल्यावर जे अनुभव येतात ते अनुभव संत ज्ञानेश्‍वरांनी अभंगातून व्यक्त केले आहेत. संत ज्ञानेश्‍वरांचे 100 अभंग आज उपलब्ध आहेत. त्यातील महत्त्वाच्या व लोकप्रिय अभंगांचे निरुपण या ग्रंथात केले आहे.

चेतक बुक्स्, पुणे 30
250
मोबाईल : 9822280424


#ज्ञानेश्‍वर #निरुपण #चेतकबुक्स्

नीतिशास्त्र, सत्यनिष्ठा आणि अभिवृत्ती

 नीतिशास्त्र, सत्यनिष्ठा आणि अभिवृत्ती  UPDATED ON 10 JAN 2023