Saturday 4 November 2017

संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज हे जगप्रसिद्ध आहेत ते त्यांच्या ज्ञानेश्‍वरी या ग्रंथामुळे. खरे तर ज्ञानेश्‍वरी हे नाव संत ज्ञानेश्‍वरांनी दिलेले नाही. त्यांनी नाव दिले ते “भावार्थ दीपिका”. पण काळाच्या ओघात लोकांनी त्या ग्रंथाचे नाव ज्ञानेश्‍वरी ठेवले आणि तेच लोकप्रिय झाले. संत ज्ञानेश्‍वरांनी, भगवदगीतेवरील ग्रंथ ज्ञानेश्‍वरी व्यतिरिक्त अमृतानुभव, हरिपाठ, चांगदेव पासष्टी व अनेक अभंग लिहिले आहेत. संत ज्ञानदेव महाराजांचे अभंग अतिशय उच्च दर्जाचे, गूढ अर्थाचे व समजण्यास कठीण असे आहेत. त्यामुळे ते फारसे लोकप्रिय नाहीत. पण त्याचा अर्थ समजला तर ते हृदयात कायमचे कोरले जातील. भक्तीतील उच्च दर्जाची अवस्था प्राप्त झाल्यावर जे अनुभव येतात ते अनुभव संत ज्ञानेश्‍वरांनी अभंगातून व्यक्त केले आहेत. संत ज्ञानेश्‍वरांचे 100 अभंग आज उपलब्ध आहेत. त्यातील महत्त्वाच्या व लोकप्रिय अभंगांचे निरुपण या ग्रंथात केले आहे.

चेतक बुक्स्, पुणे 30
250
मोबाईल : 9822280424


#ज्ञानेश्‍वर #निरुपण #चेतकबुक्स्

No comments:

Post a Comment

नीतिशास्त्र, सत्यनिष्ठा आणि अभिवृत्ती

 नीतिशास्त्र, सत्यनिष्ठा आणि अभिवृत्ती  UPDATED ON 10 JAN 2023